ट्रश्की भारतीय संस्कृतीच्या दीर्घकालीन प्रवासाचा आलेख मांडतात, तर डॅलरिम्पल विसाव्या शतकातील भू-राजकीय विघटनाचा. दोघेही दुर्लक्षित सत्यांवर प्रकाश टाकतात आणि सोयीस्कर कथनांना आव्हान देतात
सध्याच्या काळात इतिहासाचा वापर वैचारिक लढाईसाठी केला जाताना आपण पाहतो आहोत. नेमक्या अशाच वेळी ट्रश्की आणि डॅलरिम्पल यांची पुस्तके केवळ विद्वत्तेपेक्षा अधिक काहीतरी देतात, ती सोयीस्कर कथनांना पुराव्यानिशी खोडून काढतात, आणि आपल्याला आठवण करून देतात की, भारताच्या भूतकाळाला एकाच कथेत बंदिस्त करता येत नाही. विवादास्पद आणि गैरसोयीचा वाटणारा इतिहास एका चैतन्यमय लोकशाहीसाठी आवश्यक असतो.......